Sunday, 15 September 2024

तुम्ही आम्ही सर्व इंजिनिअर...

दि. १५ सप्टेंबर ! भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस... भारतवर्षात अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा !

आपणास प्रश्न पडला असेल की आपण तर इंजिनिअर नाही तरी पण आपल्याला शुभेच्छा का ? या लेखाचे प्रयोजनच ते आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्मत: इंजिनिअर असतो. दुर्दैवाने आपण केवळ व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या किंवा इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीलाच इंजिनिअर समजतो. माझ्या दृष्टीने विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक जण हा इंजिनिअर आहे आणि या सर्वांना आपण इंजिनिअर म्हणून स्वीकारले पाहिजे. पालकांनी तर त्याच्यामधील या इंजिनिअर गुण वैशिष्ट्यांचा विकास केला पाहिजे त्यासाठी पूरक वातावरण दिले पाहिजे. 

अभियांत्रिकी हा केवळ एक व्यवसाय नाही, तर एक मानसिकता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे. याचा अर्थ असा होतो की अभियंते जगाला एक जटिल प्रणाली म्हणून पाहतात, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यावर उत्तर शोधण्याची संधी म्हणून पाहतात. 

मानवी जीवनपद्धतीचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल. यासंदर्भातील काही बिंदू :

१. कुतूहल: का आणि कसे हे प्रश्न मानवी मनाला कायम पडतात. 

२. सर्जनशीलता: नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची आवड.

३. विश्लेषणात्मक विचार: समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि घडणार्‍या गोष्टींना समजून घेण्याची सवय.

४. साधनसंपत्ती: अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग शोधण्याची प्रतिभा.

५. चिकाटी: हाती घेतलेले काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार.

६. तपशीलाकडे लक्ष: गोष्टी योग्य करण्यावर भर असतो. चुक झाल्यास त्या दुरुस्त करण्याची तयारी असते.

७. सहयोग: टीमवर्क आणि संवाद आवश्यक आहे याची जाणीव.

८. सतत शिकणे: नवीन तंत्रज्ञान आणि कल्पनांसह अद्ययावत राहण्याची वचनबद्धता.

माणूस आपल्या जीवनातील दैनंदिन आव्हानावर मानसिक, बौद्धिक व तार्किक क्षमतेने मात करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न व्यावहारिक भाषेत अभियांत्रिकीच आहे असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. ते जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि नाविन्यपूर्णतेच्या संधी शोधत असतात.

प्रत्येक व्यक्ती अभियांत्रिकी मानसिकतेचा अवलंब करून, आपण अधिक चांगले समस्या सोडवणारे, नवोन्मेषक आणि नागरिक बनतात, ज्यामुळे आपल्या समाजामध्ये आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडतात.

काय पटतय ना? थोड विस्ताराने समजून घेऊ या... प्रत्येक मानवाकडे अंतर्निहित (जन्मजात) समस्या सोडवण्याची कौशल्ये, सर्जनशीलता आणि संसाधने असतात, जे इंजिनिअरचे मूलभूत गुण आहेत.

प्रत्येक माणूस एक अभियंता आहे या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी येथे काही मुद्दे आहेत:

१. समस्या सोडवणे: मानव नैसर्गिकरित्या आव्हानांशी जुळवून घेतात, अडथळ्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधतात.

२. संसाधने: लोक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनांचा पुनर्प्रयोग, पुनर्वापर आणि पुरेपूर वापर करतात.

३. सर्जनशीलता: मानव कला, संगीत, लेखन आणि सादरीकरणाच्या इतर प्रकारांद्वारे सर्जनशीलता व्यक्त करतो.

४. सर्वंकष विचार: मानव माहितीचे विश्लेषण करतात, पर्यायांचे मूल्यांकन करतात आणि माहितीवर आधारीत निर्णय घेतात.

५. प्रयोग: लोक कल्पनांची चाचणी घेतात, अपयशातून शिकतात आणि दृष्टिकोन सुधारतात.

६. सुधारणा: मानव अनपेक्षित परिस्थितींशी जुळवून घेतात, नावीन्यपूर्ण उपाय शोधतात.

७. सहयोग: लोक एकत्र काम करतात, सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य सामायिक करतात.

८. शिकणे आणि पुनरावृत्ती: मानव अनुभवांमधून शिकतात, कौशल्ये सुधारतात आणि प्रक्रिया सुधारतात.

९. नवोपक्रम: लोक नवीन कल्पना, उत्पादने आणि सेवा विकसित करतात, प्रगती करतात.

१०. लवचिकता: मानव आव्हानांवर टिकून राहतात, इंजिनिअरसारखा दृढनिश्चय दाखवून देतात.

प्रत्येक माणसामध्ये हे अभियांत्रिकी गुण ओळखून आपण काही गोष्टी करु शकतो. जसे 

- व्यक्तींना त्यांच्या जन्मजात समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा वापर करण्यास सक्षम करा

- सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण वातावरण देऊन अशा गोष्टींना प्रोत्साहित करा. 

- आंतरविद्याशाखीय सहकार्यास प्रोत्साहित करा

- अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी समुदाय विकसित करा

या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी, जीवनातील या समान धाग्यांचा विचार करावा:

- जीवन हा एक प्रकल्प आहे आणि आम्ही सर्व त्या प्रकल्पाला यशस्वी करणारे इंजिनिअर आहोत.

- प्रत्येक व्यक्ती एक इंजिनिअर आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. 

- माणूस जैविक इंजिनिअर असून तो आपले स्वतःचे शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो.

माझा युक्तिवाद वास्तवात अनुभवायचा असल्यास आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्या...

- मानवी क्षमता म्हणून इंजिनिअरची व्याख्या नव्याने मांडावी लागेल.

- तांत्रिक आणि गैर-तांत्रिक असा भेदभाव मिटवावा लागेल. 

- लोकांना त्यांची स्वतःची सर्जनशील क्षमता ओळखण्यास प्रेरित करावे लागेल. 

जळगावातील क्रिएटीव्ह गृप ही संस्था समाजाचे इंजिनियरिंग विषयी  प्रबोधन करण्याचे काम अभियंता दिनाच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करुन करीत असते. यावर्षीही दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर येथे नाशिक येथील के. के. वाघ इंजिनियरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख मा. श्री. सुनीलजी कुटे यांचे दैनंदिन जीवनात डॉ. विश्वेश्वरय्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे. 

गिरीश कुळकर्णी

9823334084 

Wednesday, 24 January 2024

प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...

अतिशय मंगलमय व पवित्र वातावरणात रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली. भारतासह अनेक देशात या निमित्ताने दिवाळी साजरी करण्यात आली. पाचशे वर्षाच्या संयमित संघर्षानंतर, अगणित रामभक्तांच्या बलिदानानंतर, हिंदुस्थानात हिंदूंच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना याची देही याची डोळा अनुभवता आली हि त्याचीच कृपा...

ह. भ. प. सद्गुरु संत श्री सखाराम महाराज यांच्या आज्ञेनुसार दि. २५ डिसेंबर ते २२ जानेवारी (२९ दिवसात) या काळात श्री रामरक्षा स्तोत्राचे १९७ वेळा पठण केले...

याच काळात गोंदवले व सज्जनगड येथे जाण्याचा व रामरक्षा पठणाचा योग आला...

संत गजानन महाराज (शेगाव), दिक्षाभुमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (नागपूर), एकविरा देवी, सिद्धेश्वर गणपती (धुळे), जोगेश्वरी माता (अंबेजोगाई), तुळजाभवानी (तुळजापूर), पांडुरंग (पंढरपूर), ढोल्या गणपती (सातारा ग्रामदैवत), नरसोबाची वाडी या पवित्र स्थानी देवदर्शन झाले...

अमरावती, नागपूर, नंदुरबार, शिरपूर, पिंपळगाव बसवंत, अंबेजोगाई, पंढरपूर, सातारा, विसापूर व शिरोळ येथे महात्मा गांधींनी मांडलेल्या रामराज्याच्या संकल्पनेच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी संवाद...

धानोरा जन्मगावी रोटरी क्लब, जळगावच्या माध्यमातून आरोग्य शिबीराचे आयोजन, ६३० मुले, महिला व नागरीकांची विनामूल्य तपासणी, २४० लोकांना विनामूल्य चष्मे, ८० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड...

प्राणप्रतिष्ठा दिनाच्या पूर्वसंध्येला कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या एकादशी व्याख्यानमालेंतर्गत कुटुंबातील राम या विषयावर व्याख्यान...
ह.भ.प. सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर येथे दर्शन आशीर्वाद...

माझे आदर्श माजी कुलगुरु अण्णासाहेब डाॅ. के. बी. पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रकाशित आत्मकथनावर व त्यांच्या जीवनावर लेखन व अभिष्टचिंतन सोहळ्यात परिवारजनांसह सहकारी शिक्षक व मित्रांची एका मोठ्या कालखंडानंतर सहवास-भेट...

या सर्वांवरील कळस म्हणजे प्राणप्रतिष्ठा दिनी अनुभवलेली हिंदु धर्माची पवित्रता, सात्विकता, अध्यात्मिकता, संयमितता, उत्सवप्रियता, एकसंघता, भावविभोरता अशा अनेक भावनांची स्पंदने... जळगावकरांचे अयोध्येतील कार्यक्रमात प्रतिनिधित्व करणारे आदरणीय अशोकभाऊंचे जळगावातील स्वागत आनंददायी, उत्साहवर्धक व देशाच्या रामराज्याकडील वाटचालीचे प्रतिक वाटले. 

प्रभु श्रीरामचंद्रांच्या चैतन्यदायी ऊर्जास्रोतामुळे जीवनात एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता अनुभवता आली.

आपण सर्व मिळून माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलेल्या आवाहनानुसार रामराज्यासाठी मतभेद संपवून एकदिलाने, स्व-अनुशासनाने, देशभक्तीने, एकात्मतेने, वाणी, मन आणि वचनाने एक होऊ या... नवीन समर्थ, संपन्न  व  संपूर्ण जगाला येणाऱ्या संकटातून दिलासा देणारा भारत घडविण्यासाठी वचनबद्ध होऊ या !

सियावर रामचंद्र भगवान की जय ! जय श्रीराम ! जय जय श्रीराम !

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४