मदतीचा हात...
Sunday, 10 August 2025
"अलख" : भाव-लय-तालांची अविस्मरणीय मैफल
Sunday, 15 September 2024
तुम्ही आम्ही सर्व इंजिनिअर...
दि. १५ सप्टेंबर ! भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस... भारतवर्षात अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा !
आपणास प्रश्न पडला असेल की आपण तर इंजिनिअर नाही तरी पण आपल्याला शुभेच्छा का ? या लेखाचे प्रयोजनच ते आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्मत: इंजिनिअर असतो. दुर्दैवाने आपण केवळ व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या किंवा इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीलाच इंजिनिअर समजतो. माझ्या दृष्टीने विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक जण हा इंजिनिअर आहे आणि या सर्वांना आपण इंजिनिअर म्हणून स्वीकारले पाहिजे. पालकांनी तर त्याच्यामधील या इंजिनिअर गुण वैशिष्ट्यांचा विकास केला पाहिजे त्यासाठी पूरक वातावरण दिले पाहिजे.
अभियांत्रिकी हा केवळ एक व्यवसाय नाही, तर एक मानसिकता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे. याचा अर्थ असा होतो की अभियंते जगाला एक जटिल प्रणाली म्हणून पाहतात, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यावर उत्तर शोधण्याची संधी म्हणून पाहतात.
मानवी जीवनपद्धतीचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल. यासंदर्भातील काही बिंदू :
१. कुतूहल: का आणि कसे हे प्रश्न मानवी मनाला कायम पडतात.
२. सर्जनशीलता: नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची आवड.
३. विश्लेषणात्मक विचार: समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि घडणार्या गोष्टींना समजून घेण्याची सवय.
४. साधनसंपत्ती: अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग शोधण्याची प्रतिभा.
५. चिकाटी: हाती घेतलेले काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार.
६. तपशीलाकडे लक्ष: गोष्टी योग्य करण्यावर भर असतो. चुक झाल्यास त्या दुरुस्त करण्याची तयारी असते.
७. सहयोग: टीमवर्क आणि संवाद आवश्यक आहे याची जाणीव.
८. सतत शिकणे: नवीन तंत्रज्ञान आणि कल्पनांसह अद्ययावत राहण्याची वचनबद्धता.
माणूस आपल्या जीवनातील दैनंदिन आव्हानावर मानसिक, बौद्धिक व तार्किक क्षमतेने मात करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न व्यावहारिक भाषेत अभियांत्रिकीच आहे असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. ते जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि नाविन्यपूर्णतेच्या संधी शोधत असतात.
प्रत्येक व्यक्ती अभियांत्रिकी मानसिकतेचा अवलंब करून, आपण अधिक चांगले समस्या सोडवणारे, नवोन्मेषक आणि नागरिक बनतात, ज्यामुळे आपल्या समाजामध्ये आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडतात.
काय पटतय ना? थोड विस्ताराने समजून घेऊ या... प्रत्येक मानवाकडे अंतर्निहित (जन्मजात) समस्या सोडवण्याची कौशल्ये, सर्जनशीलता आणि संसाधने असतात, जे इंजिनिअरचे मूलभूत गुण आहेत.
प्रत्येक माणूस एक अभियंता आहे या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी येथे काही मुद्दे आहेत:
१. समस्या सोडवणे: मानव नैसर्गिकरित्या आव्हानांशी जुळवून घेतात, अडथळ्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधतात.
२. संसाधने: लोक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनांचा पुनर्प्रयोग, पुनर्वापर आणि पुरेपूर वापर करतात.
३. सर्जनशीलता: मानव कला, संगीत, लेखन आणि सादरीकरणाच्या इतर प्रकारांद्वारे सर्जनशीलता व्यक्त करतो.
४. सर्वंकष विचार: मानव माहितीचे विश्लेषण करतात, पर्यायांचे मूल्यांकन करतात आणि माहितीवर आधारीत निर्णय घेतात.
५. प्रयोग: लोक कल्पनांची चाचणी घेतात, अपयशातून शिकतात आणि दृष्टिकोन सुधारतात.
६. सुधारणा: मानव अनपेक्षित परिस्थितींशी जुळवून घेतात, नावीन्यपूर्ण उपाय शोधतात.
७. सहयोग: लोक एकत्र काम करतात, सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य सामायिक करतात.
८. शिकणे आणि पुनरावृत्ती: मानव अनुभवांमधून शिकतात, कौशल्ये सुधारतात आणि प्रक्रिया सुधारतात.
९. नवोपक्रम: लोक नवीन कल्पना, उत्पादने आणि सेवा विकसित करतात, प्रगती करतात.
१०. लवचिकता: मानव आव्हानांवर टिकून राहतात, इंजिनिअरसारखा दृढनिश्चय दाखवून देतात.
प्रत्येक माणसामध्ये हे अभियांत्रिकी गुण ओळखून आपण काही गोष्टी करु शकतो. जसे
- व्यक्तींना त्यांच्या जन्मजात समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा वापर करण्यास सक्षम करा
- सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण वातावरण देऊन अशा गोष्टींना प्रोत्साहित करा.
- आंतरविद्याशाखीय सहकार्यास प्रोत्साहित करा
- अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी समुदाय विकसित करा
या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी, जीवनातील या समान धाग्यांचा विचार करावा:
- जीवन हा एक प्रकल्प आहे आणि आम्ही सर्व त्या प्रकल्पाला यशस्वी करणारे इंजिनिअर आहोत.
- प्रत्येक व्यक्ती एक इंजिनिअर आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
- माणूस जैविक इंजिनिअर असून तो आपले स्वतःचे शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
माझा युक्तिवाद वास्तवात अनुभवायचा असल्यास आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्या...
- मानवी क्षमता म्हणून इंजिनिअरची व्याख्या नव्याने मांडावी लागेल.
- तांत्रिक आणि गैर-तांत्रिक असा भेदभाव मिटवावा लागेल.
- लोकांना त्यांची स्वतःची सर्जनशील क्षमता ओळखण्यास प्रेरित करावे लागेल.
जळगावातील क्रिएटीव्ह गृप ही संस्था समाजाचे इंजिनियरिंग विषयी प्रबोधन करण्याचे काम अभियंता दिनाच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करुन करीत असते. यावर्षीही दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर येथे नाशिक येथील के. के. वाघ इंजिनियरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख मा. श्री. सुनीलजी कुटे यांचे दैनंदिन जीवनात डॉ. विश्वेश्वरय्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
गिरीश कुळकर्णी
9823334084
Wednesday, 24 January 2024
प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...
Friday, 22 December 2023
आयुष्यातील सुवर्णकाळाची कृतज्ञता : न्यू सिटी हायस्कुल
![]() |
| शाळेचे प्रवेशद्वार... |
अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका।
तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिन:॥
अनेक छोट्या, क्षुल्लक वस्तुंना योग्य रीतीने एकत्र आणले असता मोठमोठी कार्येही सिद्धीस जाऊ शकतात. जसे की छोट्याछोट्या गवतांना जोडून बनविलेल्या दोरखंडाने शक्तीशाली हत्ती बांधले जाऊ शकतात. आम्हा सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना एकत्रित बांधून समाजहितैषी समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी शाळा आणि त्यातील शिक्षक "संहति: कार्यसाधिका!" या युक्तीने कार्यरत आहे. आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेख प्रपंच...
‘हि आवडते मज मनापासुनी शाळा... लाविते लळा ही जसा माऊली बाळा’ प्रल्हाद केशव अत्रे यांची ही बालपणीची कविता आठवली कि एका स्वप्नाच्या दुनियेत सफर करुन येतो. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात मात्र शिक्षणाची समृद्धता आम्ही अनुभवली आहे. आजही त्या गोष्टी आठविल्या कि छाती अभिमानाने फुलून येते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कुलला प्रवेश घेतला तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास दहावीनंतर वेगळ्या वळणावर सुरु झाला मात्र न्यू सिटीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजही आयुष्यात लाभच होतांना दिसतो. बालवयात शाळेत जाण्यासाठी त्रास देणारा मी न्यू सिटीत आल्यावर मात्र 'शाळेत हो मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक अभ्यास मी करणार...' असे केव्हा म्हणायला लागलो कळलेच नाही. न्यू सिटी असे नाव आलं तरी आयुष्य समृद्ध करणारा हा चित्रपट डोळ्यासमोरुन झर्रकन पुढे जातो. शाळेचा कधी कंटाळा आला नाही किंवा कधी टाळलीही नाही. अभ्यास, खेळ, वाचन यासह अनेक गोष्टी घडत होत्या आणि आम्ही त्या आनंदाने करीत होतो. मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इंग्रजीची अवास्तव भीती वा न्यूनगंड शाळेने कधीही निर्माण होऊ दिला नाही.
![]() |
| शिक्षक वृंदासह अलीकडचा फोटो... |
आदरणीय मु. कृ. पाध्ये सर
![]() |
| मुख्याध्यापक मु. कृ. पाध्ये सर... |
या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तर्खडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय.
शाळेची खरी श्रीमंती म्हणजे आमच्या शाळेचा शिक्षकवृंद !
![]() |
| शाळेचा समृद्ध शिक्षकवृंद... |
![]() |
| शाळेचे अंतरंग... |
विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या न्यू सिटीच्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ राहू. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे.
![]() |
| इ. ७ वीत असतांनाच वर्गाचा फोटो... |
![]() |
| ज्या वर्गात शिकलो त्यात पुन्हा एकदा... |
अशा कितीतरी आठवणी आहेत पण तेवढ्या वेळ व शब्द मर्यादेमुळे लिहिणं शक्यही नाही. पण शाळेविषयी आणि शाळेतील आठवणींविषयी एवढंच सांगावसं वाटतं...
माझी शाळा जीवनाचा सुवर्णकाळ
निरागस, निष्पाप जीवांचा सुकाळ ॥
तेथेच झाली नांदी गमभनची
अन समृद्ध संस्कारित जीवनाची ॥
दंगा आणि मस्तीसाठी होते सखे-सोबती
त्यातूनच निर्मिली परमेश्वररुपी नाती ॥
त्याला नव्हत्या जाती-पातीच्या भिंती
जळती अखंड संस्काराच्या वाती
उजळती समृद्ध जीवनाच्या ज्योती ॥
स्वओळख आणि प्रगतीचा पाया
देई आत्मविश्वास ठाया ॥
ज्ञानमंदिरातील पूज्यनीय व्यक्ती
यशोमंदिरे उभविती ॥
अशी आमची शाळा होती....
अशी आमची शाळा होती... आहे... ॥
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday, 21 November 2023
प्रत्येक दिवस असाच असावा !
Sunday, 15 October 2023
गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday, 10 October 2023
मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !
टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा.
![]() |
| Courtsey: Swapneela Sethia |
१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?
२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?
३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?
४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?
५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?
६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?
७. आपण कायम उत्साही असतात का ?
८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?
९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?
१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?
११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ?
१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?
१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?
१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?
पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४



.jpg)






.jpeg)
.jpeg)

.jpeg)



