Wednesday 24 January 2024

प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...

अतिशय मंगलमय व पवित्र वातावरणात रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत झाली. भारतासह अनेक देशात या निमित्ताने दिवाळी साजरी करण्यात आली. पाचशे वर्षाच्या संयमित संघर्षानंतर, अगणित रामभक्तांच्या बलिदानानंतर, हिंदुस्थानात हिंदूंच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या प्रभु श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना याची देही याची डोळा अनुभवता आली हि त्याचीच कृपा...

ह. भ. प. सद्गुरु संत श्री सखाराम महाराज यांच्या आज्ञेनुसार दि. २५ डिसेंबर ते २२ जानेवारी (२९ दिवसात) या काळात श्री रामरक्षा स्तोत्राचे १९७ वेळा पठण केले...

याच काळात गोंदवले व सज्जनगड येथे जाण्याचा व रामरक्षा पठणाचा योग आला...

संत गजानन महाराज (शेगाव), दिक्षाभुमी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (नागपूर), एकविरा देवी, सिद्धेश्वर गणपती (धुळे), जोगेश्वरी माता (अंबेजोगाई), तुळजाभवानी (तुळजापूर), पांडुरंग (पंढरपूर), ढोल्या गणपती (सातारा ग्रामदैवत), नरसोबाची वाडी या पवित्र स्थानी देवदर्शन झाले...

अमरावती, नागपूर, नंदुरबार, शिरपूर, पिंपळगाव बसवंत, अंबेजोगाई, पंढरपूर, सातारा, विसापूर व शिरोळ येथे महात्मा गांधींनी मांडलेल्या रामराज्याच्या संकल्पनेच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचेशी संवाद...

धानोरा जन्मगावी रोटरी क्लब, जळगावच्या माध्यमातून आरोग्य शिबीराचे आयोजन, ६३० मुले, महिला व नागरीकांची विनामूल्य तपासणी, २४० लोकांना विनामूल्य चष्मे, ८० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड...

प्राणप्रतिष्ठा दिनाच्या पूर्वसंध्येला कुटुंब प्रबोधन गतिविधीच्या एकादशी व्याख्यानमालेंतर्गत कुटुंबातील राम या विषयावर व्याख्यान...
ह.भ.प. सद्गुरु श्री प्रसाद महाराज यांचे छत्रपती संभाजीनगर येथे दर्शन आशीर्वाद...

माझे आदर्श माजी कुलगुरु अण्णासाहेब डाॅ. के. बी. पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने प्रकाशित आत्मकथनावर व त्यांच्या जीवनावर लेखन व अभिष्टचिंतन सोहळ्यात परिवारजनांसह सहकारी शिक्षक व मित्रांची एका मोठ्या कालखंडानंतर सहवास-भेट...

या सर्वांवरील कळस म्हणजे प्राणप्रतिष्ठा दिनी अनुभवलेली हिंदु धर्माची पवित्रता, सात्विकता, अध्यात्मिकता, संयमितता, उत्सवप्रियता, एकसंघता, भावविभोरता अशा अनेक भावनांची स्पंदने... जळगावकरांचे अयोध्येतील कार्यक्रमात प्रतिनिधित्व करणारे आदरणीय अशोकभाऊंचे जळगावातील स्वागत आनंददायी, उत्साहवर्धक व देशाच्या रामराज्याकडील वाटचालीचे प्रतिक वाटले. 

प्रभु श्रीरामचंद्रांच्या चैतन्यदायी ऊर्जास्रोतामुळे जीवनात एक वेगळ्याच प्रकारची सकारात्मकता अनुभवता आली.

आपण सर्व मिळून माननीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केलेल्या आवाहनानुसार रामराज्यासाठी मतभेद संपवून एकदिलाने, स्व-अनुशासनाने, देशभक्तीने, एकात्मतेने, वाणी, मन आणि वचनाने एक होऊ या... नवीन समर्थ, संपन्न  व  संपूर्ण जगाला येणाऱ्या संकटातून दिलासा देणारा भारत घडविण्यासाठी वचनबद्ध होऊ या !

सियावर रामचंद्र भगवान की जय ! जय श्रीराम ! जय जय श्रीराम !

गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४