Saturday 4 December 2021

अभिव्यक्ती

ब्रीदवाक्य जीवनाचे ! 

सध्या व्यावसायिक जीवनात ब्रिदवाक्याला विशेष महत्व आहे. काही कंपन्या वा संस्था त्यांच्या ब्रिदवाक्याने ओळखल्या जातात. या ब्रिदवाक्याद्वारे संस्था / कंपनी आपले धोरण जाहीर करीत असते. कंपनीची वा संस्थेची दिशा, उद्देश या ब्रिदवाक्यातून सांगितली जाते. ती संस्थेच्या सर्व घटकांसाठी प्रेरणा देखील असते. व्यक्तिगत जीवनासाठी पण असे ब्रीदवाक्य घेऊन जगणारे काही असतील असा विचार करून समाज माध्यमाद्वारे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या जीवनाबाबत विचार करून जगणाऱ्या व ते व्यक्त करणाऱ्यांची संख्या मर्यादित असली तरी प्रत्येक जण आपले जीवन एका उद्दिष्टांनी जगत असतो कारण जीवन जगण्याचा एक हेतू असतो असा मला विश्वास आहे. या लेखातून सर्वांच्या ब्रिदवाक्यांना ढोबळमानाने  जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या मागील उद्देश आपणा सर्वांना त्यातून प्रेरणा मिळावी व आपणही आपले एक ब्रीदवाक्य घेऊन जीवनाचरण करीत आहोत ते व्यक्त करावे आहे. 

सर्वसाधारणपणे या ब्रिदवाक्यांची तीन प्रकारे विभागणी करता येईल. ती अध्यात्मिक, व्यक्तिगत विकास व नरसेवा अशी आहे. आपल्याला जीवनात काय करायचे आहे, कसे कार्याचे आहे, जीवन कसे जगायचे आहे याची स्पष्ट कल्पना येते. येथे व्यक्तींच्या भावना शब्दबद्ध करण्याचा किंवा त्यांच्याच शब्दात देत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपला देश, राष्ट्राप्रतीची आपल्या राष्ट्राच्या वारसांबद्दल आपली समर्पित भूमिका असलेली ब्रिदवाक्ये तीन व्यक्तींनी मांडली आहे. ती अशी समर्थ भारत , सुरक्षित भारत ।, ऐतिहासिक वास्तू / वस्तूना भेटी देणे, समजावून घेणे आणि लोकांपर्यंत पोहोचवणे , माझ्यामुळे राष्ट्र व धर्म मजबूत व्हायला मदत व्हावी 

व्यक्तिगत जीवनात प्रत्यक्ष कृतीला प्राधान्ये देणारी ब्रिदवाक्ये सर्वात जास्त आली आहेत. प्रामुख्याने हि वाक्ये शालेय जीवनात पालकांनी वा शिक्षकांनी आपल्या कृतिशील आचरणातून व शिकवणीतून दिलेली दिसतात. अनेकांनी व्यक्त होत असतांना त्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. यात जीवन, यश, सुख-दुःख, समाधान, समस्या, स्वप्न, मेहनत, शिक्षण, हुशारी, श्रम, कर्तव्य, प्रामाणिकपणा, विचार, प्रयत्न, सत्य, खरे-खोटे,  अपेक्षा, संकल्प, संयम, सार्थकता, सर्वोत्कृष्टता, चुका, कृती, पैसे या शब्दांचा अंतर्भाव आलेला आहे. अनुभवातून आलेली हि वाक्ये माणसाची प्रगल्भता दाखवितात. Nothing is impossible | आणि केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... हि वाक्ये प्रत्येकी दोघांनी सांगितली आहेत. इतर काही वाक्ये अशी To admit you were wrong is to declare you are wiser now than before, नेहमीच करू या सत्य तीच बात... खोट्याच्या पाठी घालू या लात..., Focus on Solutions, सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना... जीवन हे खूप सुंदर व अनंत सुख व दुःखाच्या विचारांचा महासागर आहे, Train your mind to see good in every situation. Whatever happens is always for good. Honest efforts are always rewarded. Education and hard work never go waste. We must continue to do our deeds and duties honestly. (आपण आपले कर्म व कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे.), Thus far and no further । , The best is yet to come... , दाम करी काम ।, श्रम संकल्प संयम... , कुठल्याही क्षेत्रात जा पण त्या क्षेत्रातील उत्तुंग यश मिळवा... जीवन सौहार्दपुर्ण जगा, त्यातच जीवनाचा खरा सार आहे , १) जीवनाची मर्यादा नक्की ठरवा , २) आहे त्यात समाधान मानावे , ३)  नाही त्याचे दुःख मानू नये

बहुतांश मित्रांनी नरसेवा हीच नारायण सेवा अर्थात सेवा, इतरांसाठी काही तरी करण्याची भूमिका आपल्या ब्रिदवाक्यातून मांडली आहे. आपल्याला जे मिळालं आहे, ज्यांच्यामुळे मिळालं आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून समाज ऋण फेडण्याची वृत्ती दिसते. आपल्याकडे जे अतिरिक्त आहे ते देण्याची वृत्ती या ब्रिदवाक्यातून दिसून येते. यात समाज, सामाजिक कार्य, मदत, आनंद, हित, सेवा, सहकार्य या शब्दांचा अधिक वापर दिसून येतो. काही ब्रिदवाक्ये अशी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे | घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे ||, मी सगळ्यांना मदत करेन पण मी शक्यतो कुणाची मदत घेणार नाही , सामाजिक कार्य व मदतीसाठी कायम पुढे , प्रत्येकाला सहकार्य करणे प्रसंगी स्वतःची गैरसोय कितीही गैरसोय होवो , Live life and make others Happy |, यश हे कष्टात आहे, सेवेत आहे, पैशात नव्हे |

Always be helpful to others ।, आपल्या आजूबाजूला आनंद पसरविण्याचा प्रयत्न ।, सर्वांसाठी वेळ पण वेळेत सर्व..।, जे जे आपणासी ठावें , ते इतरासी सांगावे ।, हे जीवन एकदाच मिळते, स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगा, गंजून जाण्यापेक्षा झिजुन गेलेले कधीही चांगले..., सब समाज को लिए साथ आगे जाना है । एका मित्राने आपण जे पण कार्य करू त्यापूर्वी स्वतःला चार प्रश्न विचार ते काम करायचे कि नाही हे ठरवतो आणि तीच ब्रिदवाक्ये असल्याचे सांगितले आहे. खरं तर रोटरी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते सदस्य असल्याने त्या संस्थेची कार्य करण्यासाठीची ती प्रमुख चाचणी आहे. ते चार प्रश्न Is it the TRUTH ? Is it FAIR for the all concerned ? Will it build GOODWILL and BETTER FRIENDSHIP ? Will it be Beneficial for all concerned ?

भारतीय तत्वज्ञान ज्यावर आधारित आहेत त्या अध्यात्मिक चिंतनातून मांडलेली काही वाक्ये आली आहेत. अंतिम सत्य, शाश्वत शांती, सफलता, कर्म, परमात्मा, गुरु, नामस्मरण, देव, परमेश्वर, भगवंत यांचा वापर यात दिसून येतो. काही ब्रिदवाक्ये असे. Persistence for eternal Peace , कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |, परमात्मा जे काही आहे ते मीच आहे, परमेश्वर माझ्यातून माझ्यामार्फत प्रकट होत आहे आणि सर्व काही परमेश्वराकडून येऊन परमेश्वराकडे समर्पित होत आहे. हा लेख वाचल्यानंतर आपल्यालाही आपली ब्रिदवाक्ये सुचतील. त्यावर जरुर विचार करा आणि मला कळवायला विसरू नका. 

गिरीश कुळकर्णी 

९८२३३३४०८४ 

16 comments:

  1. खुप छान लिहलं आहे. I liked your idea of writing on this topic.

    ReplyDelete
  2. मला नव्हे आपणा सर्वांना
    Not me but you.

    ReplyDelete
  3. छानच लिहिलंय,सरजी
    -अनिल रामभाऊ पाटील, जळगाव

    ReplyDelete
  4. नमस्कार.
    पक्षी जसे एक एक काडी आणून सुंदर घरटे बनवितात, तसे आपण एक एक वाक्य घेवून सुंदर लेख लिहिला आहे.खूप चांगलासंदेश दिला गेला. खरोखर अप्रतिम.
    प्रा. पी. पी. माहुलीकर, कबचौउमवि, जळगांव.

    ReplyDelete
  5. पिंपळाच्या रोपसारखं पाषाणावर टिकलं पाहिजे..

    ReplyDelete
  6. Great, my tagline is
    "forgive and forget"
    "love u jindagi"

    ReplyDelete
  7. अभिव्यक्ती हे मुलांना दिपस्तंभासारखे काम करते

    ReplyDelete