टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा.
Courtsey: Swapneela Sethia |
१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?
२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?
३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?
४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?
५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?
६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?
७. आपण कायम उत्साही असतात का ?
८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?
९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?
१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?
११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ?
१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?
१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?
१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?
पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Very nice sirji
ReplyDelete