Sunday, 10 August 2025
"अलख" : भाव-लय-तालांची अविस्मरणीय मैफल
Sunday, 15 September 2024
तुम्ही आम्ही सर्व इंजिनिअर...
दि. १५ सप्टेंबर ! भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस... भारतवर्षात अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो. आपणा सर्वांना अभियंता दिनाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा !
आपणास प्रश्न पडला असेल की आपण तर इंजिनिअर नाही तरी पण आपल्याला शुभेच्छा का ? या लेखाचे प्रयोजनच ते आहे की प्रत्येक मनुष्य प्राणी हा जन्मत: इंजिनिअर असतो. दुर्दैवाने आपण केवळ व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या किंवा इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीलाच इंजिनिअर समजतो. माझ्या दृष्टीने विद्यार्थी, शेतकरी, गृहिणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक जण हा इंजिनिअर आहे आणि या सर्वांना आपण इंजिनिअर म्हणून स्वीकारले पाहिजे. पालकांनी तर त्याच्यामधील या इंजिनिअर गुण वैशिष्ट्यांचा विकास केला पाहिजे त्यासाठी पूरक वातावरण दिले पाहिजे.
अभियांत्रिकी हा केवळ एक व्यवसाय नाही, तर एक मानसिकता, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि समस्या सोडवण्याचा एक मार्ग आहे. याचा अर्थ असा होतो की अभियंते जगाला एक जटिल प्रणाली म्हणून पाहतात, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि त्यावर उत्तर शोधण्याची संधी म्हणून पाहतात.
मानवी जीवनपद्धतीचा अभ्यास केल्यास आपल्या लक्षात येईल. यासंदर्भातील काही बिंदू :
१. कुतूहल: का आणि कसे हे प्रश्न मानवी मनाला कायम पडतात.
२. सर्जनशीलता: नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची आवड.
३. विश्लेषणात्मक विचार: समस्यांचे विश्लेषण करण्याची आणि घडणार्या गोष्टींना समजून घेण्याची सवय.
४. साधनसंपत्ती: अडथळ्यांवर मात करण्याचे मार्ग शोधण्याची प्रतिभा.
५. चिकाटी: हाती घेतलेले काम कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्धार.
६. तपशीलाकडे लक्ष: गोष्टी योग्य करण्यावर भर असतो. चुक झाल्यास त्या दुरुस्त करण्याची तयारी असते.
७. सहयोग: टीमवर्क आणि संवाद आवश्यक आहे याची जाणीव.
८. सतत शिकणे: नवीन तंत्रज्ञान आणि कल्पनांसह अद्ययावत राहण्याची वचनबद्धता.
माणूस आपल्या जीवनातील दैनंदिन आव्हानावर मानसिक, बौद्धिक व तार्किक क्षमतेने मात करण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न व्यावहारिक भाषेत अभियांत्रिकीच आहे असे मला ठामपणे नमूद करावेसे वाटते. ते जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये सुधारणा आणि नाविन्यपूर्णतेच्या संधी शोधत असतात.
प्रत्येक व्यक्ती अभियांत्रिकी मानसिकतेचा अवलंब करून, आपण अधिक चांगले समस्या सोडवणारे, नवोन्मेषक आणि नागरिक बनतात, ज्यामुळे आपल्या समाजामध्ये आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडतात.
काय पटतय ना? थोड विस्ताराने समजून घेऊ या... प्रत्येक मानवाकडे अंतर्निहित (जन्मजात) समस्या सोडवण्याची कौशल्ये, सर्जनशीलता आणि संसाधने असतात, जे इंजिनिअरचे मूलभूत गुण आहेत.
प्रत्येक माणूस एक अभियंता आहे या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी येथे काही मुद्दे आहेत:
१. समस्या सोडवणे: मानव नैसर्गिकरित्या आव्हानांशी जुळवून घेतात, अडथळ्यांवर मात करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय शोधतात.
२. संसाधने: लोक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संसाधनांचा पुनर्प्रयोग, पुनर्वापर आणि पुरेपूर वापर करतात.
३. सर्जनशीलता: मानव कला, संगीत, लेखन आणि सादरीकरणाच्या इतर प्रकारांद्वारे सर्जनशीलता व्यक्त करतो.
४. सर्वंकष विचार: मानव माहितीचे विश्लेषण करतात, पर्यायांचे मूल्यांकन करतात आणि माहितीवर आधारीत निर्णय घेतात.
५. प्रयोग: लोक कल्पनांची चाचणी घेतात, अपयशातून शिकतात आणि दृष्टिकोन सुधारतात.
६. सुधारणा: मानव अनपेक्षित परिस्थितींशी जुळवून घेतात, नावीन्यपूर्ण उपाय शोधतात.
७. सहयोग: लोक एकत्र काम करतात, सामान्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य सामायिक करतात.
८. शिकणे आणि पुनरावृत्ती: मानव अनुभवांमधून शिकतात, कौशल्ये सुधारतात आणि प्रक्रिया सुधारतात.
९. नवोपक्रम: लोक नवीन कल्पना, उत्पादने आणि सेवा विकसित करतात, प्रगती करतात.
१०. लवचिकता: मानव आव्हानांवर टिकून राहतात, इंजिनिअरसारखा दृढनिश्चय दाखवून देतात.
प्रत्येक माणसामध्ये हे अभियांत्रिकी गुण ओळखून आपण काही गोष्टी करु शकतो. जसे
- व्यक्तींना त्यांच्या जन्मजात समस्या सोडवण्याच्या क्षमतेचा वापर करण्यास सक्षम करा
- सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण वातावरण देऊन अशा गोष्टींना प्रोत्साहित करा.
- आंतरविद्याशाखीय सहकार्यास प्रोत्साहित करा
- अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण अभियांत्रिकी समुदाय विकसित करा
या कल्पनेचे समर्थन करण्यासाठी, जीवनातील या समान धाग्यांचा विचार करावा:
- जीवन हा एक प्रकल्प आहे आणि आम्ही सर्व त्या प्रकल्पाला यशस्वी करणारे इंजिनिअर आहोत.
- प्रत्येक व्यक्ती एक इंजिनिअर आहे, जो सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो.
- माणूस जैविक इंजिनिअर असून तो आपले स्वतःचे शरीर आणि मन स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करतो.
माझा युक्तिवाद वास्तवात अनुभवायचा असल्यास आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्या...
- मानवी क्षमता म्हणून इंजिनिअरची व्याख्या नव्याने मांडावी लागेल.
- तांत्रिक आणि गैर-तांत्रिक असा भेदभाव मिटवावा लागेल.
- लोकांना त्यांची स्वतःची सर्जनशील क्षमता ओळखण्यास प्रेरित करावे लागेल.
जळगावातील क्रिएटीव्ह गृप ही संस्था समाजाचे इंजिनियरिंग विषयी प्रबोधन करण्याचे काम अभियंता दिनाच्या निमित्ताने व्याख्यान आयोजित करुन करीत असते. यावर्षीही दि. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रोटरी भवन, मायादेवी नगर येथे नाशिक येथील के. के. वाघ इंजिनियरिंग कॉलेजचे विभाग प्रमुख मा. श्री. सुनीलजी कुटे यांचे दैनंदिन जीवनात डॉ. विश्वेश्वरय्या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
गिरीश कुळकर्णी
9823334084
Wednesday, 24 January 2024
प्रभु श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा निमित्ताने...
Friday, 22 December 2023
आयुष्यातील सुवर्णकाळाची कृतज्ञता : न्यू सिटी हायस्कुल
![]() |
| शाळेचे प्रवेशद्वार... |
अल्पानामपि वस्तूनां संहति: कार्यसाधिका।
तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिन:॥
अनेक छोट्या, क्षुल्लक वस्तुंना योग्य रीतीने एकत्र आणले असता मोठमोठी कार्येही सिद्धीस जाऊ शकतात. जसे की छोट्याछोट्या गवतांना जोडून बनविलेल्या दोरखंडाने शक्तीशाली हत्ती बांधले जाऊ शकतात. आम्हा सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना एकत्रित बांधून समाजहितैषी समाज निर्माण करण्याचे कार्य करणारी शाळा आणि त्यातील शिक्षक "संहति: कार्यसाधिका!" या युक्तीने कार्यरत आहे. आयुष्यातील सुवर्णकाळ अनुभवण्याची संधी देणाऱ्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेख प्रपंच...
‘हि आवडते मज मनापासुनी शाळा... लाविते लळा ही जसा माऊली बाळा’ प्रल्हाद केशव अत्रे यांची ही बालपणीची कविता आठवली कि एका स्वप्नाच्या दुनियेत सफर करुन येतो. आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धुळे शहरात मात्र शिक्षणाची समृद्धता आम्ही अनुभवली आहे. आजही त्या गोष्टी आठविल्या कि छाती अभिमानाने फुलून येते. धुळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सिटी हायस्कुलला प्रवेश घेतला तेव्हापासून सुरु झालेला हा प्रवास दहावीनंतर वेगळ्या वळणावर सुरु झाला मात्र न्यू सिटीने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आजही आयुष्यात लाभच होतांना दिसतो. बालवयात शाळेत जाण्यासाठी त्रास देणारा मी न्यू सिटीत आल्यावर मात्र 'शाळेत हो मी जाणार, पाटी घेऊनी, घेऊनी पुस्तक अभ्यास मी करणार...' असे केव्हा म्हणायला लागलो कळलेच नाही. न्यू सिटी असे नाव आलं तरी आयुष्य समृद्ध करणारा हा चित्रपट डोळ्यासमोरुन झर्रकन पुढे जातो. शाळेचा कधी कंटाळा आला नाही किंवा कधी टाळलीही नाही. अभ्यास, खेळ, वाचन यासह अनेक गोष्टी घडत होत्या आणि आम्ही त्या आनंदाने करीत होतो. मराठी माध्यमाची जरी शाळा असली तरी इंग्रजीची अवास्तव भीती वा न्यूनगंड शाळेने कधीही निर्माण होऊ दिला नाही.
![]() |
| शिक्षक वृंदासह अलीकडचा फोटो... |
आदरणीय मु. कृ. पाध्ये सर
![]() |
| मुख्याध्यापक मु. कृ. पाध्ये सर... |
या जोडीला अजून इतर परीक्षा असायच्या त्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी आणि गणिताच्या ४ परीक्षा दरवर्षी एक एक करीत ९ वी पर्यंत बहुतांश मुले द्यायचीच... तर्खडकर इंग्रजी ग्रामर तेथे कळालं. ज्यांना चित्रकलेची आवड त्यांच्यासाठी एलिमेंटरी, इंटरमिजीएट. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गीता पठण, कणकवलीची राज्य बाल्य नाट्य स्पर्धा, मनाचे श्लोक, जोडीला लक्ष लक्ष सूर्य नमस्कारासारखे उपक्रम, एनसीसी कॅम्प... स्पोर्ट मीट / वीक वगैरे भाग नव्हता कारण तो रोजचा भाग होता. सर्वच मुले हुशार आणि प्रत्येकामुळे शाळेला एक वेगळी ओळख. अर्थात हुशार म्हणजे ज्याच्या त्याच्या विषयात म्हणजे अभ्यास, खेळ, वक्तृत्व, वादविवाद, नाटक, गाणे... काही ना काही तर प्रत्येकात आहेच नं ! तेच शोधून त्यावर काम करणे हेच शाळेचे ध्येय.
शाळेची खरी श्रीमंती म्हणजे आमच्या शाळेचा शिक्षकवृंद !
![]() |
| शाळेचा समृद्ध शिक्षकवृंद... |
![]() |
| शाळेचे अंतरंग... |
विषय शिक्षणाबरोबरच जीवन विषयक दृष्टिकोन देणारे, व्यावहारिक जगाची ओळख करुन देणारे, आपल्यातील कला कौशल्याला विकसित करीत सर्वांगीण विकास साधणाऱ्या न्यू सिटीच्या शिक्षकांनी आयुष्यभराची जी शिदोरी दिली आहे त्याबद्दल कायम कृतज्ञ राहू. अर्थात हि कोणत्याही शिक्षकाची मागणी नव्हे तर त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या हृदयात आपल्या कृतीने निर्माण केलेली ती जागा आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाद्वारे मिळविलेला तो सन्मान आहे.
![]() |
| इ. ७ वीत असतांनाच वर्गाचा फोटो... |
![]() |
| ज्या वर्गात शिकलो त्यात पुन्हा एकदा... |
अशा कितीतरी आठवणी आहेत पण तेवढ्या वेळ व शब्द मर्यादेमुळे लिहिणं शक्यही नाही. पण शाळेविषयी आणि शाळेतील आठवणींविषयी एवढंच सांगावसं वाटतं...
माझी शाळा जीवनाचा सुवर्णकाळ
निरागस, निष्पाप जीवांचा सुकाळ ॥
तेथेच झाली नांदी गमभनची
अन समृद्ध संस्कारित जीवनाची ॥
दंगा आणि मस्तीसाठी होते सखे-सोबती
त्यातूनच निर्मिली परमेश्वररुपी नाती ॥
त्याला नव्हत्या जाती-पातीच्या भिंती
जळती अखंड संस्काराच्या वाती
उजळती समृद्ध जीवनाच्या ज्योती ॥
स्वओळख आणि प्रगतीचा पाया
देई आत्मविश्वास ठाया ॥
ज्ञानमंदिरातील पूज्यनीय व्यक्ती
यशोमंदिरे उभविती ॥
अशी आमची शाळा होती....
अशी आमची शाळा होती... आहे... ॥
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday, 21 November 2023
प्रत्येक दिवस असाच असावा !
Sunday, 15 October 2023
गांधीतीर्थवरील दोन वर्षे : आनंद, अभिमान व प्रगल्भतेची !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Tuesday, 10 October 2023
मानसिक आरोग्याचा मंत्र : आनंदी जगणं !
टीव्ही व समाज माध्यमही मानसिक गोंधळातच भर घालतांना दिसत आहे. सावधानता बाळगणे व संयमित राहणे या दोन गोष्टी आपल्याला काही बंधने घालण्यासाठी प्रवृत्त करु शकतात अर्थात त्यासाठी आपणच आपल्या जीवनाकडे डोळसपणे पाहणे अगत्याचे ठरते. तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर हि या निमित्ताने एक संधी आहे. आपण आनंदी असणे हे कुटुंबीय, सहकारी व मित्रपरिवार यासाठी आवश्यक आहे. समाजात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो. कोवळ्या वयातील मुलांच्या आत्महत्या असो वा इस्रायल मधील युद्ध, कार्यालयातील कामाचा ताण असो वा कुटुंबातील आव्हाने असोत या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो व स्वाभाविकपणे तो आपल्या परिघातील प्रत्येकावर जाणते-अजाणतेपणी होत असतो. आपण कितपत आनंदी आहोत हे जाणून घेण्यासाठी खालील प्रश्न स्वतःला विचारुन पहा.
![]() |
| Courtsey: Swapneela Sethia |
१. आपल्याला आपले आयुष्य हे बक्षीस आहे असे वाटते का ?
२. आपण स्वतःमधील व इतरांमधील चांगुलपणा शोधण्यासाठी सक्षम आहोत का ?
३. आपण आपल्या भविष्याबद्दल आशादायी आहात का ?
४. आपण आपल्या रोजच्या कामातून आनंद मिळवतो का ?
५. आपणास पदोपदी व क्षणोक्षणी आनंद वाटतो का ?
६. आपणास आपल्या जीवनात काहीतरी उद्देश व अर्थ आहे असे वाटते का ?
७. आपण कायम उत्साही असतात का ?
८. आपण इतरांना काही देतो त्यावेळेस आनंद मिळतो का ?
९. विपरीत परिस्थितीतही मी चांगले शोधू शकतो का ?
१०. दिवसभरातील भावनांचा स्वीकार व स्वागत करतो का ?
११. कुटुंबियांच्या व मित्रपरिवाराच्या नियमित संपर्कात असतो का ?
१२. जेव्हा परिस्थिती गंभीर असते त्यावेळेस पुढाकार घेऊन सहाय्य्यभुत होतो का ?
१३. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ वाटते का ?
१४. भूतकाळातील निराशा व दुःख विसरु शकतो का ?
पहा... विचार करा... बदल करा... आपल्या निरामय दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Friday, 14 July 2023
...तेथे कर माझे जुळती !
काही व्यक्ती पद, प्रतिष्ठा, अनुभव यासर्वांनी सिद्ध असूनही साधी असतात. त्यांच्या जगावेगळ्या कार्यकर्तृत्वाने ती प्रेरणादायी ठरतात. या माणसांची असामान्य चिकाटी, मेहनत, धडाडी आणि प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या वटवृक्षाप्रमाणे कडक उन्हात निश्चल उभे राहून दुसऱ्यांना मात्र सावली देण्याची उदार वृत्ती बाळगून असतात. या व्यक्ती पाहिल्या, अनुभवल्या आणि आठवल्या तरी कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतील या काव्यपंक्ती सहज मनी येतात.
यज्ञी ज्यानी देउनि निजशीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर, नाही चिरा नाही पणती ॥
हे सर्व आठविण्याचे कारण म्हणजे जीवनात अनुभवलेले आदरणीय डॉ. प्रताप जाधव ! मागच्या शुक्रवारी (दि. ७ जुलै) पंढरपूर येथे असतांना रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याचे कळले. अस्वस्थ झालो. सकाळी उठल्यापासून सोबतच्या सहकाऱ्याजवळ त्यांच्या आठवणी जागवतच दिवस घालवला. मागील ८ दिवसात एक दिवस असा गेला नाही कि डॉक्टर साहेबांची आठवण आली नाही. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' म्हणजे काय आणि कसे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टरसाहेब. या देव माणसाशी चांगला संपर्क होता. कधीही भेट झाली कि परिवारातील एक सदस्य या नात्याने सहज भावाने बोलत. बोलणंही अघळपघळ असायचे. त्यात विषय वा अन्य कसलेही बंधन नसायचे. कायम हसतमुख. पेशंट कितीही तणावात असला तरी त्याचा ताण सहज दूर करायचे. मागील २५ वर्षात किमान १० वेळा तरी मी हा अनुभव घेतला आहे. कधी वैयक्तिक उपचारासाठी तर कधी नातेवाईकांसाठी. एका बाजूला उपचार, ऑपरेशन सुरु तर दुसऱ्या बाजूला हसतहसत बोलणे... एक शब्द सहज यायचा होईल ना ! बघू... काही विचारलं कि हा शब्द ठरलेला.
पूर्वीच्या दवाखान्यात वा आत्ताच्या दवाखान्यातील एक पाटी मला प्रचंड आवडायची. उक्ती ला कृतीची जोड दिल्यावर माणसाची प्रतिमा उजळून निघते. ती पाटी होती... 'खोटी बिले मागून सरकारी तिजोरी लुटू नये.' समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल चीड होती व त्यावर प्रखर, सडेतोड प्रतिक्रिया द्यायचे. स्पष्टवक्ता तर होतेच पण त्याला कृतिशीलतेची जोडही होती. यात कुठल्याही प्रकारचा 'अहं' भाव नसायचा. डॉक्टरांचा व्यवहार निर्व्याज होता. 'देगा उसका भी भला न देगा उसका भी भला' अशी वृत्ती होती. मानवी जीवनाचे नीतिनियम व व्यवहार इतक्या सहजपणे पाळत अर्थात त्यामागे त्यांची तपस्या होती. सकाळी एकदा दवाखान्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत ओपीडी व ऑपरेशन्स चालत. मी कधीही त्यांना थकलेले पाहिले नाही. रात्री १०.३० वाजता पण तोच उत्साह असायचा. आपल्या आजाराबद्दल वा दुखण्याबद्दल कधीही बोलत नसत. विषय काढला तरी टाळत. आईच्या 'नी' रिप्लेसमेंट्च्या वेळी व काकूंच्या हिप जॉईन्टच्या वेळी या शस्त्रक्रिया आपण लवकरच सुरु करीत आहोत असे म्हणालेत. मात्र त्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही.
कविवर्य बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती... आणि म्हणून मला म्हणावे वाटते ...तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Friday, 19 May 2023
आपण सर्व 'जीवरक्षक' !
एखाद्या आपत्कालीन परिस्थितीचा शिकार झालेल्या व्यक्तीला पुनर्जीवन मिळवून देणारे हे तंत्र असल्याने त्याला बेसिक लाईफ सपोर्ट असेही म्हणतात. एखादा व्यक्तीची जर श्वसन क्रिया आणि हृदयक्रिया बंद पडून तो बेशुद्ध झाला असेल तर त्याला देण्यात येणारा अतिमहत्वाचा प्राथमिक उपचार म्हणजेच बेसिक लाईफ सपोर्ट... यालाच CPR किंवा जीवन संजीवनी क्रिया असे म्हणतात. रामायणात हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून लक्ष्मणाला जीवनदान दिले होते. तशाच प्रकारची आपत्कालीन परिस्थितील व्यक्तीला जीवनदान देणारे हे तंत्र आहे. १० पैकी ३ व्यक्तींना त्याचा फायदा होतो अर्थात त्यांना जीवनदान मिळते.
CPR कोणीही करू शकतो. त्याला फारशा कौशल्याची आवश्यकता नसते. कोणीही जाणकार अर्थात CPR कसे द्यायचे हे माहित असलेला व्यक्ती छातीवर दाब व कृत्रिम श्वास देऊ शकतो. पुढील वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्या व्यक्तीची भूमिका महत्वपूर्ण ठरते. CPR केव्हा करावे ? याचे सोपे उत्तर आहे एखादी व्यक्ती बेशुद्ध आहे, तिची हृदयक्रिया व श्वसन क्रिया बंद आहे. अशा व्यक्तीला CPR करावे. जेव्हा परिस्थिती फारशी सुरक्षित न वाटल्यास किंवा माणूस प्रतिसाद देत असल्यास व शरीर थंड व कडक झाले असल्यास CPR करू नये. आपण CPR आहे त्याच जागी सुरक्षितता लक्षात घेऊन देण्यास सुरुवात करावी. जीवन संजीवनी क्रिया अर्थात CPR हि माणसाला जिवंत ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांची शृंखला आहे. आठ वर्षावरील स्त्री-पुरुष यांच्यासाठी आपण हि क्रिया करू शकतो.
जीवन संजीवनी क्रियेत ३ महत्वाच्या पायऱ्या आहेत. त्याला CAB म्हणतात. म्हणजे Circulation (रक्ताभिसरण), Airway (श्वसनमार्ग) आणि Breathing (श्वासोच्छवास). रक्ताभिसरणासाठी छातीवर दाब द्यावा. यासाठी व्यक्ती जमिनीवर असावी किंवा एखाद्या कडक – सपाट पृष्ठभागावर असावी. रक्ताभिसरण अखंडीत सुरु राहण्यासाठी छातीवर दाब देणे आवश्यक आहे. छातीच्या (बरगडीच्या) सर्वात खालच्या हाडाच्या दोन बोटे वरती हा दान देणे आवश्यक आहे. हाताची दोन्ही बोटे एकात एक गुंफून, कोपर सरळ ठेवून दोन्ही खांदे दाब द्यावयाच्या व्यक्तीच्या छातीवर असावेत. साधारणपणे एका मिनिटात १००-१२० वेळा दाब दिला पाहिजे. प्रत्येक ३० दाबानंतर छोटा पॉझ घेऊन CPR सुरु ठेवणे. साधारणपणे २ मिनिटात १५० वेळा दाब दिला गेला पाहिजे. छातीवरील दाबाचा भाग ५ सेंटीमीटर दाबला गेला पाहिजे. दाब सोडल्यानंतर छाती पूर्ववत झाली पाहिजे. दाब देण्याची क्रिया व्यक्ती शुद्धीवर येई पर्यंत वा तसा प्रतिसाद देईपर्यंत सुरु ठेवणे अपेक्षित आहे अन्यथा अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता कमी असते. दाब देत असतांना तो मोजला पाहिजे. आपण काही वेळात आपण थकणार असल्याने आजूबाजूच्या कोणा व्यक्तीला CPR देण्यासाठी तयार करणे. संबंधित व्यक्तीचा कोणताही प्रतिसाद मिळाल्यास त्याला एका कुशीवर करावे.
साधारणपणे CPR केव्हा दिला जातो त्याची उदाहरणे -
१. एखाद्या व्यक्तीला जर विजेचा शॉक लागत असेल तर त्याचा श्वास अडकतो. तेव्हा CPR देऊन आपण त्या व्यक्तीला कदाचित वाचवू शकतो.
२. जेवताना कधी कधी अन्न अडकल्यानंतर CPR देता येतो.
३. गोळ्यांचा आकार मोठा असेल तर ते देखील अडकण्याची शक्यता असते. तेव्हा CPR देता येतो.
४. विषबाधा झाल्यानंतर ते विष बाहेर काढण्यासाठी CPR देतात.
५. पाण्यात जर कोणी बुडत असेल तर त्याला वर काढल्यानंतर छातीवर दाब देऊन पाणी बाहेर काढल्यानंतर तोंडातून श्वास देऊन CPR दिला जातो.
६. अपघातात जास्त रक्त वाहून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
७. एखाद्याच्या डोक्याला मार लागून बेशुद्ध झाल्यास CPR देता येतो.
८. चक्कर येऊन पडल्यास CPR देता येतो.
यासह अनेक परिस्थतीत वरील तीनही लक्षणे आढळून आल्यास CPR देत येतो.
रोटरी क्लब सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी, के. डी. पाटील मल्टीस्पेशॅलिटीच्या डॉ. लीना पाटील, पार्ष क्लिनिकचे डॉ. कल्पेश गांधी व भूलतज्ज्ञ डॉ. धीरज चौधरी यांनी प्रत्यक्षिकाद्वारे संपूर्ण प्रक्रिया , तसेच वेगवेगळया परिस्थितीत घ्यावयाची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले. तसेच अनेकांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. एका खेळाडूला सलग ६ तास CPR देऊन त्याला जीवनदान देण्यात आले. तसेच काश्मीरमध्ये झालेल्या एका अपघातातील ४ व्यक्तींना CPR देऊन जीवदान देण्यात आळायचे अनुभव उपस्थित डॉक्टरांनी कथन केले. चला तर मग आपणही आपल्या परिसरातील डॉक्टरांकडून माहिती घेऊन जीवनरक्षक होऊ या व इतरांना त्यासाठी प्रेरित करू या !
गिरीश कुळकर्णी
९८२३३३४०८४
Saturday, 13 May 2023
रत्नांच्या खाणीचा निर्माता : 'रत्नाकर' !
![]() | |
| आमची शाळा - न्यू सिटी हायस्कुल, धुळे |
![]() | |
| आमच्या शाळेचे वैभव - गुरुजनवर्ग |
![]() |
| विक्षिप्तपूरची चित्तरसेना नाटकातील कलाकार |
विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी अशा शिक्षकांचे असणे किती महत्वाचे असते हे आजच्या शैक्षणिक जीवनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते. अशा या महत्वाच्या वर्षांतील सुवर्ण काळाची नेहमीच अलीकडच्या काळाशी स्वाभाविकपणे तुलना होते. मी ती करणार नाही पण रानडे सरांसारख्या गुरुजनांनी अनेक पिढ्या आपल्या कर्तव्य कठोरतेने घडविल्या असे नक्की म्हणता येईल. कधी शिक्षाही केली असेल मात्र तक्रार नाही कारण त्या काळातील शाळेचा विद्यार्थी आज जो काही आहे त्यामागे या सर्व गुरुजनांचा वाटा महत्वाचा आहे. शाळेच्या प्रत्येक घटकावर त्यांचे नेहमीच नियंत्रण होते. शाळेतील विद्यार्थ्याला आपल्या पोटाच्या मुलांप्रमाणे वाढविणारी हि पिढी होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षा केली तरी पालकांची कधीही तक्रार नव्हती. आम्ही सर्व भाग्यवान आहोत, आम्ही न्यू सिटीचे विद्यार्थी आहोत, अशा ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभिमान असणे हीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची पावती म्हटली पाहिजे.
![]() |
| आमची १९८५ ची बॅच |
सेवानिवृत्ती नंतरही सर कार्यरत होते. संस्थेचे काही काळ सचिव म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. संस्कार भारतीसारख्या कलासाधकांच्या संस्थेचे ते प्रदेश कार्यकारिणी सदस्य होते. नाट्य लेखन, दिग्दर्शन हे त्यांचे विशेष आवडीचे विषय होते. इ. ८ वी मध्ये असतांना श्री. रानडे सर, नित्सुरे सर व यु. आर. कुलकर्णी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे नाटक बसविले. कोकणासारख्या दूरवर प्रदेशात बाल नाट्य स्पर्धेत शाळेचा सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक पटकविण्याची कामगिरी सरांनी केलेली आजही आठवते. गीता पठाण स्पर्धा, मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा यासारख्या उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रोत्साहन देत असत. वक्तृत्व व निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन स्वतःचा वैयक्तिक वेळ देऊन सर्व शिक्षक मंडळी करीत असत त्यात श्री. रानडे सरांचा वाटा मोलाचा होता. विद्यार्थ्यांकडून मेहनत करुन घेत असतांना वेळ आणि पदरचे पैसे खर्च करतांना हे शिक्षक कधीही मागेपुढे पाहत नसत.
अलीकडे धुळ्याचा संपर्क कमी झाला असला तरी अधूनमधून सरांची भेट होत असे. एकदा तर सरांच्या घराजवळच भेट झालेली आठवते. शिष्य फाउंडेशनच्या माध्यमातून २०११ मध्ये झालेल्या स्नेहमेळाव्याप्रसंगी सर्व शिक्षकांची झालेली भेट आजही स्मरणात आहे. श्री. दाबके सरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातही रानडे सरांची भेट झाली होती. अजिबात थकलेले वाटले नाही. तीच शरीर यष्टी, चेहऱ्यावरील तेज, जिवंतपणा बोलण्यातील सहज मिश्कीलता. सरांकडे पाहिल्यावर ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजींची आठवण येत असे. शिक्षकांमधील परस्पर संवाद - संबंध व विद्यार्थ्यांची त्याच्या प्रति असलेली निष्ठा कृतार्थतेचा आनंद देणारे होते. अशा संस्थेच्या व तेथील शिक्षक वृंदांच्या ऋणातून उतराई होणे केवळ अशक्य मात्र त्यांना जीवन जगण्याचे धडे आत्मसात करुन त्याप्रमाणे जगणे हीच त्या महानुभावांनी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल असे मला वाटते.
र. गो. रानडे सरांच्या पवित्र आत्म्यास सद्गती लाभेलच व त्यांच्या परिवाराला त्यांच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो. ॐ शांती शांती शांती !!
Thursday, 11 May 2023
"ती" आणि एका लग्नाची पुढची गोष्ट !
सोहन वाचन कट्टा ( मंगळवार १४ - ३ -२०२३) विषय - माझ्या आयुष्यातील "ती"
वय वर्ष १५ ते ४५ या माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या काळात "ती" माझ्या आयुष्यात होती. याच काळात तारुण्य, करिअर, लग्न, मुलं, संसार असतो. आयुष्यातील अजुन अनेक महत्त्वाच्या सुखदुःखाच्या गोष्टी याच काळात घडतात. खुपच धावपळ व धकाधकीचा हा काळ असतो. पण माझ्या अनुभवावरून मला असे वाटते की प्रत्येकीने त्या चार दिवसात जसा जमेल तसा आराम नक्कीच केला पाहिजे. कारण आधीच्या पिढीतील स्रियांना सक्तीची विश्रांती मिळत होती. आपले पुर्वज खरोखरच खुप हुशार होते. त्यांना शास्र, आरोग्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास होता असे मला वाटते. आधीच्या पिढीच्या तुलनेत आम्ही या मैत्रिणीचे महत्त्व कमी केले असे वाटतेय. त्यामुळे आम्हाला व आमच्या पुढील पिढीला "ती"चा थोडा त्रास होतोय. पण खरे तर "ती"च्याभोवतीच स्रिचे आरोग्य बांधले गेलंय. तब्येत चांगली असेल तर "ती"चे येणे नियमीत होते. आपले मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम असेल तर "ती"चे येणे कधीच वेदनादायी होत नाही. आयुर्वेदात खुप बारकाईने हिचा विचार व अभ्यास केलाय, तो पण आपण विचारात घेतला पाहिजे. पुर्वीच्या काळात आरोग्यासह इतर सर्वच गोष्टींसाठी देवधर्माच्या भीतीचा आधार घेतला जायचा पण आताच्या काळात आपल्या मुलांना सर्व सायंटिफिक गोष्टींचा पुरावा द्यावा लागतो. आपण पण सगळ्या गोष्टींमागचे शास्र स्वतः समजुन घेऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते. तरच सगळ्याचा प्रवास सुखकर व आनंददायी होईल. "ती" सगळ्याच सखींची सखी आहे फक्त तिला थोडं अटेन्शन देण्याची गरज आहे. आपण सर्वजणी ते करूया. खरंच "ती" माझ्या आयुष्यात नसती तर खुप गोष्टी मला मिळाल्या नसत्या असे मला वाटते. त्यामुळे "ती" च्या बद्दल खुप खुप कृतज्ञता व्यक्त करते.
अलीकडच्या काळात या विषयावर मोकळेपणाने बोललं जातंय हि अतिशय सुखावह गोष्ट आहे. त्यामुळे या विषयाबाबतची जागरुकता वाढत आहे. पती-पत्नी नात्यात निर्माण होणारे ताण-तणाव यामुळे सुटण्यास नक्कीच मदत होते. नाटकाच्या सुरुवातीला आयुष्यातील सर्वच प्रश्नांना गुगल उत्तर देऊ शकत नाही आणि त्यांच्या आयुष्यात शोधलेले उत्तर प्रत्येकाच्याच आयुष्यात कामी येईल असे नाही. त्यासंबंधातील धोका मोकळेपणाने सांगितला आहे. वैवाहिक जीवनातील आनंद हिरावलेल्या नवऱ्याला त्या आनंदाकडे नेण्यासाठी बायको मुलाच्या सांगण्यावरुन मानसशास्त्रावरील गिल्ट थिअरीवर आधारित नाटक घडवून आणते आणि तिला त्यात अपेक्षित परिणाम मिळतो. या रचित नाटकात कार्यालयातील एका मुलीला आपल्या बॉसची गर्लफ्रेंड बनविले जाते. त्यातील वेगवेगळे टप्पे गाठत गोष्ट 'डेट' पर्यंत जाते. मात्र सामान्य कुटुंबातील नवऱ्याला आपण काहीतरी चूक करीत आहोत असे नेहमी वाटत राहते. त्या मुलीशी केलेल्या नकली प्रेमातून त्याला आपल्या असली प्रेमाची आठवण होते. मेमरी फुल झाली आणि त्यात आणखी काही नवीन भर घालायची असल्यास जुन्या आठवणी डिलीट मारणारा (विसरणारा) हा नवरा मात्र आपल्या आयुष्यातील त्या नाजूक क्षणांना विसरू शकत नाही आणि त्याला आपली चूक उमगते आणि आनंद पुन्हा मिळतो अशी साधारण कथा आहे.



.jpg)






.jpeg)
.jpeg)

.jpeg)



















