Monday 27 February 2023

अनुभूतीची स्वरानुभूती अन दादाजींना श्रद्धावंदन !

अनुभूती इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय दादाजींच्या श्रद्धावंदन दिनी स्वरानुभूती अर्थात भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाचे भाऊंच्या उद्यानात आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय अशोकभाऊ जैन, पद्मश्री ना. धो. महानोर दादा, अनुभूती इंटरनॅशनलचे चेअरमन श्री. अतुलभाऊ जैन, संचालक सौ. निशाभाभी जैन व प्राचार्य श्री. देबसिस दास यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली आणि लगेचच भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरु झाला. 

श्रद्ध्येय मोठ्या भाऊंना गुरु आणि पालकांप्रती विशेष आदर होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतांना ते हि गोष्ट आवर्जून अधोरेखित करीत असत. जीवनात आपण प्राप्त केलेल्या प्रत्येक गोष्टींमागचे कारण असतात गुरु आणि पालक. आपल्या जीवनाचा मूलभूत पाया असलेल्या, परम आदरणीय गुरु आणि पालकांसाठी प्रार्थना सादर करण्यात आली... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील या सामुदायिक प्रार्थनेतील ३ कडवी विद्यार्थ्यांनी सादर केलीत. प्रार्थनेचा अर्थ आहे आमचे आचार-विचार अत्यंत शुद्ध असावे यासाठी सद्बुद्धी दे, सत्कर्म करायची प्रवृत्ती दे, सत्याचा अभ्यास दे, सत्यस्वरूपाचे ज्ञान दे...

है प्रार्थना गुरुदेव से ,यह स्वर्गसम संसार हो ।

 अति उच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो ॥

ना हम रहे अपने लिये, हमको सभी से गर्ज है ।

 गुरुदेव ! यह आशीष दे ,जो सोचने का फर्ज है ॥ १॥


हम हो पुजरी तत्व के , गुरुदेव के आदेश के ।

 सच प्रेम के , नीत नेम के , सध्दर्म के ॥

हो चीड झुठी राह कि अन्याय कि अभीमान की।

 सेवा करनने को दास की ,पर्वा नही हो के जान की ॥२॥


छोटे न हो हम बुध्दी से , हो विश्वमयसे ईशमय।

 हो राममय अरु कृष्णमय , जगदेवमय जगदीशमय ॥

हर इंद्रियों ताब कर , हम वीर हो अति धीर हो ।

 उज्ज्वल रहे सरसे सदा , निहधर्मरत खंबीर हो ॥ ३॥


अति शुध्द हो आचारसे , तन मन हमारा सर्वदा ।

 अध्यात्म की शक्ती हमे , पलभी नहि कर दे जुदा॥

इस अमर आत्मा क हमें, हर श्वासभरमें गम रहे ।

 गर मौतभी हो आगयी, सुख दुःख हम से सम रहे ॥५॥


मनुष्य प्राण्याचा एकच धर्म आणि तो म्हणजे सर्वांप्रती प्रेमभावना, बंधुत्वाची भावना. आम्ही सर्व त्या प्रभूची लेकरे असल्याने आपला सर्वांशी असलेला व्यवहार प्रेमाचा व समानतेचा असला पाहिजे तर आपण या भूतलावरच स्वर्गाची अनुभूती घेऊ शकू असे दादाजी नेहमी सांगत. कधीही कुणाला तुच्छ मनू नये. प्रेम आणि माणुसकीची भावना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणारे साने गुरुजी यांचे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. खरा तो एकचि धर्म...

खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे ।।


जगी जे हीन अति पतित

जगी जे दीन पद दलित

तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


सदा जे आर्त ‍अति विकल

जयांना गांजती सकल

तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


कुणा ना व्यर्थ शिणवावे

कुणा ना व्यर्थ हिणवावे

समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


प्रभूची लेकरे सारी

तयाला सर्वही प्यारी

कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे ।।


असे हे सार धर्माचे

असे हे सार सत्याचे

परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे ।।

श्रद्ध्येय मोठे भाऊ हे गांधी विचारांचे पाईक होते. गांधीजींचा साधेपणा, नम्रता, सत्यता, अहिंसा आणि इतर दैवी गुणांचा अंगीकार दादाजींनी आपल्या जीवनात केला होता. विपरीत परिस्थितीतही त्यांनी या मूल्यांशी तडजोड केली नाही. गांधीजींच्या तत्त्व आणि जीवनशैली सोबतच गांधीजींना प्रिय असलेली भजनेही दादाजींना विशेष आवडत असत. १५ व्या शतकात संत नरसी मेहता यांनी रचलेले भजन  वैष्णव जन तो तेणे कहीए... त्यांना विशेष आवडत असे. खरा वैष्णव तोच जो दुसऱ्यांच्या दुःखाला समजून घेतो, इतरांना केलेली सहाय्याबद्दल कधीही अहंकार बाळगत नाही, जो सर्वांचा सन्मान करतो अन कोणाचीही निंदा करीत नाही. हेच भजन मुलांनी सादर केले. 

वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥


सकल लोकमां सहुने वंदे,

निंदा न करे केनी रे ।

वाच काछ मन निश्चळ राखे,

धन धन जननी तेनी रे ॥


समदृष्टि ने तृष्णा त्यागी,

परस्त्री जेने मात रे ।

जिह्वा थकी असत्य न बोले,

परधन नव झाले हाथ रे ॥


मोह माया व्यापे नहि जेने,

दृढ़ वैराग्य जेना मनमां रे ।

रामनाम शुं ताली रे लागी,

सकल तीरथ तेना तनमां रे ॥


वणलोभी ने कपटरहित छे,

काम क्रोध निवार्या रे ।

भणे नरसैयॊ तेनुं दरसन करतां,

कुल एकोतेर तार्या रे ॥


वैष्णव जन तो तेने कहिये,

जे पीड परायी जाणे रे ।

पर दुःखे उपकार करे तो ये,

मन अभिमान न आणे रे ॥

यानंतर मनुष्याचे जीवन अनमोल असून यासाठी मनुष्य कर्माने, वचनाने, शरीराने पवित्र असला पाहिजे आणि असा माणूसच खऱ्या अर्थाने महान असतो. वाणीतील मधुरता, सरलता, डोळ्यातील विमलता हीच माणसाची शान आहे, या अर्थाचे भजन विद्यार्थ्याने सादर केले. पवित्र मन रखो...

पवित्र मन रखो पवित्र तन रखो,

पवित्रता मनुष्यता की शान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

बड़ा ही मुलये वाण है तुम्हरा ये जनम,

जगत की कर्म भूमि में करो भले कर्म.

अच्छे रखो विजार उत्तम करो वेहवार

आदर्श व्यक्ति की ये पहचान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

तुम अपनी आंख में अमृत रखो विमल विमल सदा विमल विमल,

तुम्हरो वाणी में माधुर हो सदा सरल सरल,

तुम को के नीर विकार सबका करो सत्कार,

ये जन्म तुम्हारा इम्तेहान है,

जो मन कर्म वचन से पवित्र  है,

वो चरित्र बाण नहीं यहाँ महान है,

'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते...' या भारतीय परंपरेचे कट्टर समर्थक असलेल्या दादाजींना स्त्रीच्या दैवी शक्तीबद्दल कायम आदर वाटत असे. त्यांच्या उक्ती, कृती आणि विचारात स्त्रीबद्दल आदर व उच्च सन्मान होता. स्त्रीच्या दैवी शक्तीची संस्कृतमधील देवी स्तुती दादाजींना प्रिय होती. तीच स्तुती विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सादर केली. 

कमलां कमलासनमुख 

कमलां कमलासनमुख - दिविज - सुनतपद - युगलाम 

विमलां मतिमनिशं यदि वाच्छसी जगदीसे संस्मर ||

इन्दूगणसु - समवदनाम - इंन्दीवरनिभ - नायनाम 

मन्दस्मित - रुचिराधर - पल्लव - द्वंद्वविनुत - सुंदरहरि - लीलाम ||

क्षीरशरधिरवर तनयां नीरज गण कृतं निलयाम |

चारु नयनकृत - नीराजनद्युति - पुरित श्रीहरिप्रिय - जायाम    

श्रीलक्ष्मीस्तुती  



दादाजी स्वतःला शेतकरी समजत असत व तीच ओळख प्रथम देत असत. एक उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करीत असतांना ते सदैव आपल्या भारतीय संस्कृतीशी निगडित राहिले. भारतीय कला, संस्कृती व साहित्याबद्दलच्या प्रेमाबद्दल आपण त्यांना ओळखतोच. ते केवळ व्यावसायिक नव्हते तर त्यांना कलेबद्दल विशेष जाण होती. त्यांना वेगवेगळ्या राज्यातील गाण्यांचीही विशेष गोडी होती. त्यातीलच उत्तर प्रदेशातील एक आवडते गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. बरसन लागी बदरिया...  

बरसन लागी बदरिया झूम झूम के...

बोलन लागी कोयलिया झूम झूम के

आयो सावन अति भावन

रूम झूम रूम झूम के

सखिया गावें कजरिया झूम झूम के...।  


लाग रही तेरी सावन की झड़ी ए री 

ए मैं भीजत तुम बिन कबसे खड़ी..

सपने में आए पिया मोरा मन ले गयो... 

दे गए असुअन की झड़ी...। 


गरजत बरसत भीजत आई हो तुम्हरे मिलन को 

अपने प्रेमी पियरवा लो गरवा लगाय...।

आपल्या देशात भक्त कवींमध्ये संत कबीर दास का यांचे स्थान खूप वरचे आहे. जीवनातील अतिशय कठीण प्रसंगांचे वर्णन त्यांनी सध्या, सोप्या, सरळ शब्दात केले आहे. असेच एक संत कबीर यांचे भजन सादर करण्यात आले. या भजनात धनाचा तू अहंकार करू नकोस, आपल्या शरीराचा गर्व करू नकोस,  पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे ते नाजूक असते. हवेच्या एका झोक्याने तो मातीत मिसळून जातो. 'मत कर माया का अहंकार,,,'

मत कर माया को अहंकार

मत कर काया को अभिमान

काया गार से काची

मत कर माया को अहंकार

मत कर काया को अभिमान


काया गार से काची

हो काया गार से काची

जैसे ओस रा मोती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

ऐसा सख्त था महाराज

जिनका मुल्कों में राज

जिन घर झूलता हाथ

जिन घर झूलता हाथी

हो जिन घर झूलता हाथी

उन घर दिया ना बाती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

खूट गया सिन्दड़ा रो तेल

बिखर गया सब निज खेल

बुझ गयी दिया की बाती

हो बुझ गयी दिया की बाती

रे जैसे ओस रा मोती

झोंका पवन का लग जाए

झपका पवन का लग जाए

काया धूल हो जासी

काया तेरी धूल हो जासी

झूठा माई थारो बाप

झूठो सकल परिवार

झूठी कूटता छाती

झूठी कूटता छाती

हो झूठी कूटता छाती

जैसे ओस रा मोती

बोल्या भवानी हो नाथ

गुरुजी ने सर पे धरया हाथ

दादाजींचा मूळ गाव राजस्थानातील ! काही दशकांपूर्वी त्यांचे पूर्वज जळगावात आले आणि येथेच स्थायिक झाले. त्यांच्या मातृभूमीच्या प्रेमाचे प्रतीक असलेले उदाहरण म्हणजे संत मीराबाईंचे भजन. परमेश्वराला संपूर्ण शरण व समर्पणाने भरलेले हे भजन. थोडा खोलवर विचार केला तर आपल्या भ्रम आणि इगो पासून बाहेर यावे असा संदेश देणारे हे भजन होय.असीम भक्ती आणि समर्पणाचा भाव असलेलले भजन विद्यार्थ्यांनी सादर केले. मने चाकर राखो जी...

 

श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो जी

चाकर रहसूं बाग लगासूं,

नित उठ दरसण पासूं।

वृन्दावन की कुंजगलिन में

तेरी लीला गासूं॥


श्याम मने चाकर राखो जी


चाकरी में दरसण पाऊं,

सुमिरण पाऊं खरची।

भाव भगति जागीरी पाऊं,

तीनूं बाता सरसी॥


श्याम मने चाकर राखो जी


मोर मुकुट पीतांबर सोहै,

गल बैजंती माला।

वृन्दावन में धेनु चरावे

मोहन मुरलीवाला॥

मीरा के प्रभु गहिर गंभीरा,

सदा रहो जी धीरा।

आधी रात प्रभु दरसन दीन्हें,

आधी रात प्रभु दरसन दीन्हें,

प्रेमनदी के तीरा॥


श्याम मने चाकर राखो जी


चाकर रहसूं बाग लगासूं,

नित उठ दरसण पासूं।

वृन्दावन की कुंजगलिन में

तेरी लीला गासूं॥


श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो जी

श्याम मने चाकर राखो

श्याम मने चाकर राखो

श्याम मने, श्याम मने,

श्याम मने चाकर राखो जी 

भारतात विविधतेत एकता आढळते. दादाजी याचे उत्साही समर्थक होते. अशा विविधतेतून लोकांना एकत्र एका व्यासपीठावर आणून त्यांना एका विशिष्ट ध्येयासाठी प्रवृत्त करणे हे त्यांचे वैशिष्ट्यच होय. असेच एकतेचा सार सांगणारे गीत "आकाशगंगा" जे दादाजींच्या कायम ओठावर असे ते सादर करण्यात आले. गुजराती भाषेतील हे देशभक्तीपर गीत ज्यात पृथ्वी, तारे, आकाश, नदी, सूर्य, चंद्र आणि हे विश्व ज्यात आपण राहतो ते कोणाचे ? अर्थात ते आपले सर्वांचेच. शब्द, भाषा वेगवेगळी असेल, जागा वेगवेगळी असेल मात्र सर्वांच्या भावना एकच ! गडद अशा ढगांमध्ये ज्या प्रमाणे इंद्रधनुष्य आपण पाहतो  तसेच आपण सर्व आपले रंग, पंथ सोडून एकजुटीने राहू या ! 


आकाश गंगा सूर्य चन्द्र तारा , 

संध्या उषा कोई ना नथि । 

कोनि भूमि , कोनि नदी ,

कोनि सागर धारा , 

भेद केवल शब्द आमारा ने तमारा । 


एज हास्य एज रुदन , आश ए निराशा , 

एज मानव उर्मि , पण भिन्न भाषा । 

मेघधनु अन्दर ना होय कदी जंगो , 

सुन्दरता काज वन्या विविध रंगो ॥

भक्ती संगीत संध्या कार्यक्रमाची सांगता दादाजींच्या आवडत्या प्रार्थनेने झाली. भूतलावरील सर्वांच्या कल्याणाची हि प्रार्थना. तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे...


तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे सबका मंगल,

सबका मंगल, सबका मंगल होय रे

जिस गुरुदेव ने धरम दिया है, उनका मंगल होय रे,

जिस जननी ने जनम दिया है, उसका मंगल होय रे

पाला-पोसा और बढ़ाया, उस पिता का मंगल होय रे

इस जगत के सब दुखियारे प्राणी का मंगल होय रे

जल में, थल में और गगन में सबका मंगल होय रे

अन्तरमन के गाँठें टूटे, अन्तर निर्मल होय रे

राग, द्वेष और मोह मिट जाये, शील समाधि होय रे

शुद्ध धर्म धरती पर जागे, पाप पराजित होय रे

इस धरती के तर तिन में, कण-कण में धर्म समोय रे

शुद्ध धर्म जन-जन में जागे, घर-घर शांति समोय रे

तेरा मंगल, मेरा मंगल, सबका मंगल होय रे 

अनुभूतीच्या क्वायर (Choir) समूहाने कार्यक्रमाची प्रस्तुती केली. भजने व गीत सादर करणारे विद्यार्थी होते. वीरा महाकाल , स्तुती गर्ग , ऋत्वा शाह , प्राप्ती गुगळे , शर्वरी मोरे , सात्विका सुरतवाला , गीतिका  पुतचकायला , श्लोक कवळी 

कि बोर्डवर साथ दिली ती आत्मन छाजेड , ढोलकीवर तनिश सिंघवी , ड्रम राधे पटेल , तबला - आदर्श  पाटील , मेहेर लाडके , घुंगरू - वेदांत माहेश्वरी कार्यक्रमाचे संचालन केले विरती बाँठिया व वेदिका  कलंत्री 

संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले होते शिक्षिका कविता उपासनी यांनी तसेच तबल्यावर साथ दिली ती भूषण गुरव तर हार्मोनियमवर साथ देण्यासाठी होते अंकित कुमार सर सर्वांचे मनापासून अभिनंदन ! 


1 comment:

  1. सरजी,
    आपण केलेले लेखन खूप सुंदर आणि भावस्पर्शी आहे. गीतांचा अर्थ जगण्यासाठी कशी प्रेरणादायी असतात हे सांगणारे अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण श्रध्देय मोठ्याभाऊंच्या विचारांचे स्मरण करून देत होता

    ReplyDelete