सध्या संपूर्ण जगात "कोरोना" या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याला वैश्विक महामारी म्हणून जाहीर केले आहे. या आजाराची लस अजून निर्माण झालेली नसल्याने हा आजार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी त्या त्या देशाची सरकारे व प्रशासन आवश्यक ती पावले उचलत आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये हा एकमेव सध्या उपाय आहे. मानवाला अशा प्रकारे अनेक दिवस घरात स्वतःला बंद करुन घेणे तसे कठीण असले तरी नाईलाज म्हणून त्यांनी ते स्वीकारलेले दिसते आहे. या गोष्टीचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. या मानसिक अस्वस्थतेवर उपाय शोधण्यासाठी भारताचे पंतप्रधान काही वेगवेगळ्या कृती करण्याचे आवाहन करीत आहेत. यापूर्वी या आजाराच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या देशसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थाळी / घंटी वाजविण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर "कोरोना"च्या या लढाईत आपण एकटे नसून देशाची १३० कोटी जनता आपल्यासोबत आहे, हा विश्वास जागविण्यासाठी मागील रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी नागरिकांनी घरातील वीज बंद करुन दिवे लावण्याचे आवाहन केले होते.
- दिवे लावण्याच्या उपक्रमात ९८% नागरिकांनी सहभाग घेतला.
- पंतप्रधानांच्या आवाहनामुळे दिवे लावणाऱ्यांची संख्या केवळ 30 टक्के.
- कोरोनाच्या संकटाला सामोरे जातांना कृतज्ञता व्यक्त करणे किंवा आम्ही सोबत आहोत यासारखे
- उपक्रम राबविले पाहिजे असे 95 टक्के लोकांना वाटते.
- दिवे लावणे उपक्रमात सहभागी झाल्याने भावनिक समाधान मिळ्णाऱ्यांची संख्या ९८ टक्के.
- दिवे लावणे हि सहेतुक व अध्यात्मिक कृती असल्याचे वाटणाऱ्यांची संख्या ९४ टक्के.
- कोरोनाबाबत ९८ टक्के नागरिक जागरुक असून योग्य ती काळजी घेतात.
- कोरोना हटविण्यासाठी भारत सरकार अपेक्षित उपाययोजना करीत असल्याचे ९६ टक्के लोकांना वाटते.
- ज्यांनी थाळी वाजविण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला नव्हता अशा २६ पैकी १७ व्यक्तींनी दिवे लावण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला.
- सरकारच्या सूचनांचे पालन करुन सहयोग देणाऱ्यांची संख्या ७६ टक्के आहे.
- लॉक डाऊन मधील वेळ कुटुंबासोबत घालविणाऱ्यांची संख्या ५० टक्के.
- दिवे लावणे सारखे उपक्रम राबविण्याची गरज न वाटणाऱ्या २१ पैकी १३ जणांनी दिवे लावले. त्यातील ७ जणांनी कार्यक्रम म्हणून तर ६ जणांनी आध्यात्मिक कृती म्हणून तसे केले. ८ व्यक्तींनी दिवे लावले नाही त्यातील ४ जणांना हि गोष्ट अंधश्रद्धा वाटते तर इतरांना राजकीय स्टंट वाटतो.
प्रिय मित्र गिरीशराव ...
ReplyDeleteकोरोना, पंतप्रधान व भारतीय माणूस यांचे प्रतिबिंब उमटवणारा आणि ठोस निष्कर्षाप्रत नेणारा सर्वे तुम्ही केलात. असा सर्वे करावा, हे भाजपला सूचले नसेल. PMO ला या सर्वेचा निष्कर्ष किमान हिःदी भाषेत लिहून मेल करा. मला खात्री आहे, त्याचा उल्लेख मोदी जनआवाहनात किंवा मन की बात मध्ये करतील. दिवे लावणी या विषयाचे वेगवेगळे पैलू समोर आले. तुम्ही उत्तम सर्वेक्षक आहात, हे पुन्हा सिद्ध झाले. जळगावमध्ये कचकड्याचे स्तंभ बनलेल्यांना शहाणपण शिकवणारे तुमचे कार्य आहे.
अभिनंदन
दिलीपराव धन्यवाद ! प्रयत्न करतो.
Deleteस्तुत्य प्रयत्न !
ReplyDeleteधन्यवाद !
ReplyDeleteछान अभ्यासपूर्ण ...
ReplyDelete